तापमानवाढीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत अनुपस्थितीची सवलत

पुणे – राज्य सरकारने प्रखर उन्हामुळे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. अनेक ठिकाणच्या शाळा दुपारच्या सत्रात असतात. यावेळेत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सवलत देण्यात येणार आहे, असे निर्देश राज्य सरकारकडून आले आहेत. उद्या २२ एप्रिलपासून ही सवलत लागू होणार आहे.

राज्यातील सर्व शाळांनी तापमानवाढीमुळे विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.या प्रस्तावाला राज्य सरकाने मान्यता दिली आहे.उद्या २२ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना शाळेत गैरहजर राहण्याबाबत सवलत मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना सुचना दिल्या.राज्यातील मराठवाडा,विदर्भात तापमानांने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे उपाय म्हणून राज्यातील विद्यार्थांना शाळेत गैरहजर राहण्यास सवलत देणे आवश्यक आहे.शाळेत याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हामुळे मुलांच्या शरिरावर परिणाम होत असतो.आतापर्यंत राज्यात ४० अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.त्यामुळे शक्यतो उन्हाच्या तडाख्यापासून शालेय विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शिक्षण मंडळासह इतर बोर्डाच्या शाळांनाही याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top