तेलंगणात ज्या प्रकारे लोकांचे राज्य असे मॉडेल राबवून लोकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत त्याच प्रकारे देशभरात आदिवासी व इतरांसाठी काम केले जाईल. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हणाले. ते आज अदिलाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निर्मल नगरमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टिका केली. ते म्हणाले की, मोदी आरक्षणाच्या विरोधात आहेत. केंद्र सरकार सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करत आहे. सार्वजनिक क्षेत्रात मागासवर्गासाठी रोजगाराच्या संधी होत्या त्या आता जाणार आहेत. केंद्राची अग्निपथ योजनाही आरक्षण संपवण्यासाठीच आहे. आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवण्या बाबत मोदी आतापर्यंत काहीही बोललेले नाहीत. सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय पातळीवर जातीआधारित जनगणना केली जाईल याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या सभेला तेलंगणात प्रचंड प्रतिसाद मिळाला.