लखनौ- थंडीची लाट आणि दाट धुक्याच्या पार्श्वभूमीवर लखनौच्या जिल्हा प्रशासनाने काल मंगळवारी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली.
जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी राम प्रवेश यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, लखनौ जिल्ह्यातील सर्व शाळांना ६ जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.लखनऊ जिल्ह्यासह संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात सध्या थंडीची लाट सुरू असून कडाक्याची थंडी पडली आहे.त्यामुळे पूर्व प्राथमिक ते इयत्तापर्यंत आठवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.तसेच
९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू ठेवताना त्यांच्यासाठी फक्त सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असावी.
तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळेवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,असे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.