नवी दिल्ली
दक्षिण-पश्चिम भारतात आज पहाटे 3.39 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हा भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजली गेली असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
शनिवारी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यासह शिमला आणि कुल्लूच्या वरच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंदवण्यात आली. यापूर्वी हिमाचलमध्ये तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामध्ये चंबा हे केंद्र मानले जाते. डोंगराळ भाग असल्याने हिमाचलमध्ये भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.