दिवा शहरातील दातिवली तलावाचे काम कासवगतीने

ठाणे- ठाणे महापालिकेच्या माध्यमांतून काही तलावांच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेंतर्गत १५ तलावांची डागडुजी केली जात आहे. परंतु यातील दिवा शहरातील दातिवली तलावाचे डागडुजी काम मात्र कासवगतीने सुरू असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दिव्यातील दातिवली हा एकमेव तलाव आहे. या तलावाची डागडुजी ठेकेदारामार्फत केली जात आहे. ही डागडुजी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर २० ते २५ टक्के सुद्धा झालेली नाही.याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाणे पालिकेमार्फत केल्या जाणार्‍या १५ तलावांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ५३.३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी प्रत्येकी २५ टक्के रक्कम केंद्र आणि २५ टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. तसेच उर्वरित ५० टक्के रक्कम महापालिका देणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top