नवी दिल्ली- केंद्र सरकार जून महिन्याच्या अखेरीस लिलावाच्या चौथ्या फेरीत सुमारे २० दुर्मिळ खनिज खाणींची विक्री करणार आहे, अशी माहिती केंद्रीय खाण सचिव व्ही.एल. कांथा राव यांनी दिली. पहिल्या फेरीत विक्रीसाठी ठेवलेल्या सात दुर्मिळ खाणींची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून एक महिन्यात त्यांचा निर्णय जाहीर केला जाईल असेही कांथा राव यांनी सांगितले.
तांबे,लिथियम,निकेल, कोबाल्ट आणि दुर्मिळ पृथ्वीचे घटक यांसारखी दुर्मिळ खनिजे आजच्या वेगाने वाढणाऱ्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील आवश्यक घटक आहेत. पवन टर्बाइन आणि विद्युत नेटवर्कपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या गतीने या खनिजांची मागणी वेगाने वाढत आहे,असे कांथा राव यांनी सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राव म्हणाले की, जेव्हा खाणकामाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही खूप लिलाव केले आहेत त्यानंतर आता आम्ही ३८ दुर्मिळ खाणींचे लिलाव करणार आहोत. जून महिन्यांच्या अखेरीस ही लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल. सरकारने आधी सांगितले होते की,पहिल्या टप्प्यात विक्रीसाठी ठेवलेल्या २० पैकी १३ खाणींचा लिलाव अल्प प्रतिसादामुळे लिलाव रद्द केला आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या २० पैकी १८ खाणींसाठी ५६ प्रत्यक्ष आणि ५६ ऑनलाइन निविदा प्राप्त झाल्या आहेत.