वाई : वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. यामुळे झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरून त्यांचे संसारपयोगी साहित्य व बैल वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे, प्रशासन अधिकारी, किसन वीर कारखान्याचे पदाधिकारी, लगतच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.