निवडणुकीमुळे पुढील वर्षी बजेट नाही

नवी दिल्ली – २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर होणार नसून लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करण्यात येणार आहे. पुढील वर्षीचा अर्थसंकल्प पुजुलै महिन्यात मांडला जाणार आहे. मे-जूनमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सत्तेवर येणारे नवे सरकार हे बजेट सादर करेल. सार्वत्रिक निवडणुकांनंतरच आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण अर्थसंकल्प जूनमध्ये सादर केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. त्या भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)च्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरम’मध्ये त्या बोलत होत्या. सितारामन म्हणाल्या की, मला विचका करायचा नाही,परंतु १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार नसून ते लेखानुदान असेल. कारण पुढील वर्ष हे निवडणुकांचे असेल. लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या योजनांचा समावेश नसेल. लेखानुदानात प्रामुख्याने नवीन सरकार येईपर्यंतच्या खर्चाचा समावेश असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top