नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा नुकताच पार पडला.दौरा जाहीर झाल्यानंतर लगेच विमानतळाला जोडणाऱ्या अक्राळे रस्त्याची दुरुस्तीही सुरू झाली.मात्र दौरा संपल्यानंतर ग्रामस्थांनी या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर आक्षेप घेतला. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचे कामच बंद केले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी एक कोटी ६० रुपये मंजूर झाले.ठेकेदाराने त्या पैशांतून रस्त्याचे एकाच बाजूचे काम केले.निधी संपल्यानंतर काम बंद केले होते.मात्र,आता पंतप्रधान मोदी येणार असल्याने रस्त्याचे काम सुरू झाले होते.पण दौरा संपल्यावर ग्रामस्थांनी कामाची पाहणी केली.त्यावेळी ठेकेदरांच्या माणसाला अंदाजपत्रकाबाबत विचारणाही केली.ठेकेदाराच्या माणसाकडून कुठलीही माहिती मिळाली नाही. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेताच संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती थांबवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पूर्ण झाल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.