पन्हाळ्यातील वारणा नदीत हजारो मृत माशांचा खच

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कोडोली- चिकुर्डे धरणाजवळ आणि काठावर हजारो मृत माशांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या वारणा नदीत रसायन मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हे मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. तसेच हे पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.
या नदीच्या पाण्याची पातळीवर कमी झाली आहे. त्यातच कंपन्या आणि कारखान्यातील रासायनिक पाणी या पत्रात सोडले जात आहे.त्यामुळे आतापर्यंत लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. काल सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार उघडकीस आला.कोडोली धरण आणि वांग नदीपात्राच्या बाजूला सुमारे पाच हजार लहान-मोठ्या मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले.याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप होत आहे. संबंधित कारखानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top