उल्हासनगर – केमिकल कंपन्यांकडून रासायनिक द्रव्ये आणि नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, भंगार पाण्यात मिसळल्याने वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे.तरी उल्हासनगरातून जाणार्या प्रदूषित नदीची स्वच्छता करावी,अशी मागणी वालधुनी नदी संवर्धन समितीने केली आहे.
कंपन्यांच्या रसायनाबरोबर आता मासे विक्रेतेही उरलेला मासळीचा कचरा आणि थर्माकोलचे बॉक्स या नदीमध्ये टाकत आहेत. त्यामुळे वालधुनी नदी अधिकच प्रदूषित बनत चालली आहे.गेल्या पाच वर्षात पालिकेने तीनवेळा या नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबविली आहे.तरीही परिस्थिती ‘जैसे थे’आहे. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि वालधुनी नदीची स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी संवर्धन समितीचे पदाधिकारी शशिकांत दायमा यांनी केली आहे.