सावंतवाडी- तालुक्यातील बांदा – वाफोली-विलवडे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सर्वत्र मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी या भागांत कोसळलेल्या पावसामुळे डांबरीकरण उखडून खड्डे पडले आहेत.वाफोली धरणाजवळ तर पुलावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून राहिले आहे.
वाहनचालकांना या रस्त्यावरून आपली वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. तसेच शाळकरी मुलांनाही या रस्त्यावरुन चालत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तरी बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक वाहनचालक आणि नागरिक करत आहेत.