बायजू कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी वींद्रन यांनी मालमत्ता गहाण ठेवली

तिरुअनंतपुरम

भारतातील आघाडीची एडटेक कंपनी बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून या कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. रवींद्रन यांनी सुमारे १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे निवासस्थान आणि तपशील अद्याप उघड झालेला नाही. बायजूने अलीकडेच अमेरिकेतील किड्स डिजिटल रि़डिंग प्लॅटफॉर्म विकला. त्यानंतरही कंपनी संकटात आहे. बायजूच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top