भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल

गुवाहाटी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो न्याय यात्रा आज नागालँडच्या तुली येथून आसामच्या शिवसागर जिल्ह्यातील हलुवाटिंग मार्गे आसाममध्ये दाखल झाली.
राहुल गांधी यांनी आज पहाटेच बसमधून आसामच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ते आसाममध्ये दाखल झाले. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी जमले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top