भिवंडी- दोन दिवसांपूर्वी भिवंडी तालुक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे भातझोडणीवेळी भात भिजले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.तर दुसरीकडे दिवाळीच्या मुहूर्ताची वाट पाहत असलेले वीटभट्टी मालकही अडचणीत आले आहेत.
वीटभट्टीच्या ठिकाणी अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने वीटभट्टी मालक चिंतेत पडले आहेत.हे वीटभट्टी मालक दिवाळीच्या मुहूर्तावर वीटभट्टी कामकाज सुरू करणार होते. मात्र अचानक अवकाळीचा पाऊस कोसळला आणि त्यांचा मुहूर्त रखडला आहे.तसेच सध्या शेतकर्यांची भात झोडणी सुरू आहे.त्यामुळे दोन दिवसांच्या पावसाने भात भिजल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.अचानक आलेल्या पावसामुळे आता शेतकर्यांनी आपले भाताचे भारे ताडपत्रीने झाकून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.