जळगाव- जळगावातील केळी पीक उत्पादन शेतकऱ्यांना केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलच्या विभागाने सरकारविरोधात शिंगाडा मोर्चा काढला. आंदोलकांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो बॅनरवर उलटे लावून सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केळी पिक विमा कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पिक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळावे, अशी आंदोलकांनी मागणी केली. या मोर्चात पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील या तिघांचे फोटो उलटे लावण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती, इंदिरा पाटील, सोपान पाटील, बी.एस. पाटील, माघी आमदार सतीश पाटील, अशोक लाड आणि वंजारी वन राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.