मतदानासाठी सुट्टी न देणार्‍या खासगी कंपनीविरुद्ध कारवाई!

मुंबई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी भरपगारी सुट्टी अथवा सवलत दिली नाही,अशा तक्रारी आल्या तर संबधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे.त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील,असेही निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top