मांजरा धरणात ६ टक्के पाणीसाठा तीन जिल्ह्यांवर पाणी संकटाचे ढग

बीड – राज्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यावर पाणी संकटाचे ढग आता गडद होतांना पहायला मिळत आहेत. कारण या तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा अवघ्या ५ टक्क्यांवर आला आहे.

मांजरा धरणातील पाणी
झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा देखील कमी होत चालला असल्याने राज्यातील अनेक भागात तर मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवत असून ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागविली जात आहे. तरीदेखील काही भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.हीच परिस्थिती आता बीड जिल्ह्यात जाणवू लागली आहे.सध्या मांजरा धरणाt असलेला पाणीसाठा ६.३६ टक्क्यांवर आला आहे. उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने धरणात असलेला पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. अवघ्या ४ दिवसात तब्बल ०.८० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.यामुळे चालू एप्रिल आणि पुढील मे महिन्यात बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top