मुंबई, ठाणे, जळगावात ३ बड्या ज्वेलर्सवर ईडीची धाड

मुंबई- राज्यभरात विविध ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आली आहे. जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत ३१५ कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. ईडीने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश यात आहे. ईडी ने जळगाव, नाशिक आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले. ईडीकडून याआधीही जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असलेल्या या ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापा टाकण्यात आला होता. यावेळी तब्बल २४ तासापासून अधिक काळ दुकानाची चौकशी करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top