ठाणे
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मेट्रोचे काम सुरु असताना उंचीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. या अपघातानंतर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. जोपर्यंत कामगाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
याबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शीने म्हटले की, हा अपघात झाल्यानंतर परिसरातील एकही व्यक्ती त्या कामगाराच्या मदतीसाठी आली नाही. घटनास्थळापासून अगदी १० मिनिटाच्या अंतराववर रुग्णालय असून देखील त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. मी रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका पाठवण्यास सांगितले, मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले. मी रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने या कामगाराचा मृतदेह बाजूला केला. त्यानंतर जवळपास एक तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.