नायपीडाव- म्यानमारच्या काचिन राज्यात विस्थापितांच्या छावणीवर लष्कराने केलेल्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला, तर ५९ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. हा हल्ला सोमवारी मध्यरात्री झाला. काचिन पीस नेटवर्क सिव्हिल सोसायटी समूहाचे प्रमुख स्थानिक कार्यकर्त्या खोन जा यांनी याबाबत माहिती दिली.
विस्थपितांसाठी उभारण्यात आलेली छावणीवर काचिन इंडिपेडन्स ऑर्गनाझेशनच्या (केआयओ) नियंत्रणाखालील भागात आहे. केआयओ ही संघटना अनेक दशकांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढते. या संघटनेची गणना म्यानमारमधील वांशिक बंडखोर गटांमध्ये केली जाते. दरम्यान, लष्कराने सोमवारी मध्यरात्री अचानक बॉम्बहल्ला केला. यात संपूर्ण गाव उध्वस्त झाले. तब्बल ६३ वर्षांनंतर या ठिकाणी हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. म्यानमार गेल्या २ वर्षांपासून विविध क्षेत्रात संघर्ष करत आहे. शॅडो नॅशनल युनिटी गव्हर्मेंटने या हल्ल्यासाठी लष्कराला जबाबदार धरले आहे.