रहिमाबादमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना प्रवेश बंद

अमरावती- मराठा आरक्षण मागणीचा मुद्दा आता गावागावात जोर धरू लागला आहे.अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील रहिमाबाद गावातील तरुणांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश द्यायचा नाही अशी घोषणा केली आहे.
गावातील मराठा तरुण आणि सकल मराठा समाजाचे नागरिक आदींनी एकत्र येऊन हा पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय घेण्यासाठी गावात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी शिवसेना जिल्हा युवा सेना अधिकारी के.के. जाधव,अनिल चिंचपुरे, बालाजी शिरसाठ, किरण नवल,दीपक शिरसाठ,अक्षय जाधव,शिवा तुपे,अनिल तुपे आणि साहेबराव चिंचपुरे यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top