मुंबई
राज्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून थंडीची लाट सुरु झाली आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा सातत्याने घटत आहे. राज्यात पुढील ५ दिवसांत थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगावात काल राज्यातील सर्वात कमी म्हणजेच ९.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली, आज जळगावचा पारा १०.३ अंश सेल्सिअस होता.
नाशिकमध्ये ११.९, पुण्यात ११.५, माथेरान १३, औरंगाबादमध्ये १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. कोरड्या हवेमुळे आणि उत्तर भारतातील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गारठा राहणार आहे. बहुतेक ठिकाणी धुके पडून पहाटे दृष्यमानता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पर्वतीय भागात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात तापमानात गारठा वाढण्याची शक्यता आहे.