नवी दिल्ली
राष्ट्रपती दौपदी मुर्मु या देशाच्या प्रथम नागरिक आहेत . पण आज त्या अयोध्येत आल्या नाहीत . नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळीही त्या उपस्थित नव्हत्या .त्यांना अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिल्याचे छायाचित्र व्हायरल केले होते . पण त्यांच्या राजशिष्टाचार नियमांमुळे इतरांना अडचण होईल हे लक्षात घेऊन त्या आल्या नाहीत अशी चर्चा आहे . आज सायंकाळी दिल्लीत त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले गेले. उद्या पंतप्रधान या बालवीरांशी संवाद करणार आहेत .
आज विज्ञान भवन इथे हा कार्यक्रम झाला. अतुलनीय साहस, कला, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा, या क्षेत्रात विलक्षण कार्य करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात. यंदाचे पुरस्कार हे १९ मुलांना जाहीर झाले असून असून यात महाराष्ट्राच्या आदित्य विजय ब्रम्हे याला त्याच्या साहसासाठी मरणोत्तर पारितोषिक देण्यात आले.