कोलकाता
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये पोहोचली. येथे राहुल यांनी विडी बनवणाऱ्या महिला कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या यात्रेचा आज 19 वा दिवस होता.
बुधवारी भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमधील मालदा येथे पोहोचली होती. त्यानंतर ही यात्रा मुर्शिदाबादमध्ये दाखल होताच राहूल गांधी यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जीपवरुन प्रवास करत राहुल गांधी यांनी हात दाखवत कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर त्यांनी विडी बनवणाऱ्या महिला कामगारांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी न्याय यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि उत्तर दिनाजपूर मालदा आणि मुर्शिदाबाद या सहा जिल्ह्यांचा दौरा केला. या कालावधीत न्याय यात्रेने 523 किमी अंतर कापले आहे.