लग्नाहून परतणाऱ्या कुटूंबाचा अपघात! ४ ठार! १० जखमी

यवतमाळ

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या कुटूंबाचा अपघातहोऊन त्यात ४ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाला रस्त्यावरून बाजूला केले त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे लग्नाचा स्वागत समारंभ होता. हा समारंभ आटोपून पाहुणे परत यववतमाळकडे परतत होते. राळेगाव यवतमाळ मार्गावर त्यांचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात २ लहान मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top