नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुका कधी होणार, याबद्दल सध्या विविध अटकळी बांधल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. देशाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्यांना हे पत्र पाठवले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी ही तात्पुरती तारीख धरून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात यावे. यामुळे देशात १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याचे म्हटले जात आहे. हे पत्रानंतर विचारणा होऊ लागल्यावर निवडणूक आयोगाने लगेच त्याची दखल घेत याचा इन्कार केला आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी हे पत्र पाठवण्यात आले असून त्यातील तारीख केवळ संदर्भासाठी असल्याचे म्हटले आहे.