व्यभिचारी असल्याच्या कारणाने मुलांचा ताबा नाकारता येणार नाही! दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली – पालक व्यभिचारी असल्याच्या एकमेव कारणामुळे मुलांचा ताबा देणे नाकारता येणार नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका घटस्फोटाच्या दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला.

पालक व्यभिचारी आहे म्हणून ते मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत असा विचार करणे चुकीचे आहे असे उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सुरेश कुमार कैत आणि निना बन्सल क्रिष्णा यांनी म्हटले आहे. पालक केवळ व्यभिचारी आहे म्हणून त्यांना ताबा द्यायचा नाही असे होऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. जो पर्यंत या अशा प्रकारच्या नात्यांचा मुलांवर विपरित परिणाम होत नाही तोपर्यंत त्यावर आक्षेप घेता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. नवी दिल्लीतील एका जोडप्याच्या मुलींच्या ताब्या बाबत निकाल देतांना न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवले. आपला नवरा आपल्याला न सांगता वा मुलींनाही न सांगता एखाद्या आश्रमात जातो असा आरोप बायकोने ठेवला आहे. पतीच्या बहिणीच्या नवऱ्याने आपल्या मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचेही पत्नीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. तर आपली पत्नी ही मुलांची चांगली काळजी घेणार नाही कारण तिचा मोठा वेळ हा केवळ तिच्या अनैतिक नात्यात जातो असे पतीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने मुलांचा दिलेला संयुक्त ताबा कायम ठेवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top