अभिनेता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटात ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर ” हा शाहरूखचा डायलॉग असून नेटकऱ्यांनी या डायलॉगचे कनेक्शन समीर वानखेडे यांच्याशी जोडले. या डायलॉगला प्रत्युत्तर देत वानखेडे यांनी म्हटले की मला तुझी तसूभरही भीती वाटत नाही. हा डायलॉग मला फालतू आहे . मी आतापर्यंत बरीच घरे, पूल जाळली आहेत आणि त्या जळालेल्या घरांवर व पुलांवर नाचलो आहे. त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नको .
२०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्रूझवर छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी झाली, असा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छाप्यात अनेकांना अटक केली. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होतो. त्याचवेळी समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक होते. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. मात्र त्यानंतर काही काळाने समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला. आर्यन खानच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी आर्यनच्या कुटुंबियांकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तेव्हापासून दोघांत वाद आहे .