सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावात गेल्या ४५ दिवसांपासून नळपाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. गावात जलजीवन मिशनची पाईपलाईन टाकण्याच्या कामात देखील उशीर होत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गावात तांत्रिक पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलजीवन मिशनची पाईपलाईन टाकण्याचे काम लवकराच लवकर पूर्ण करावे, ज्यामुळे गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटेल, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर लवकर उपाय न काढल्यास गावातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.