मुंबई – वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. आकाश सिंह असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काल रात्री तो टॅक्सीतून या ठिकाणी आला होता. त्याने टॅक्सी ड्रायव्हरला टॅक्सी थांबवायला सांगितली आणि उतरून पुलावरून उडी मारली. रात्री उशिरा त्याचा मृतदेहबाहेर काढण्यात आला.