सौम्य हिवाळ्यामुळे देशात वीजवापर घटला

नवी दिल्ली- गेल्या डिसेंबर महिन्यात देशभरात सौम्य हिवाळ्याचे दिवस सुरू होते. प्रामुख्याने उत्तर भारतात सौम्य हिवाळ्यामुळे पाणी गरम करण्याच्या विद्युत उपकरणाचा वापर कमी करण्यात आला.अशा परिस्थितीमध्ये डिसेंबर महिन्यात विजेचा वापर २.३ टक्के घटला होता.११९.०७ अब्ज युनिट (बीयू) इतका वीज वापर झाला होता.

विश्लेषकांच्या मते डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात थंडी सौम्य जाणवली.त्यामुळे वीज वापर जास्त झाला नाही. त्यावेळी विजेची मागणी कमी होती.मात्र याच महिन्यात दुसर्‍या पंधरवडय़ात विजेची मागणी वाढली.२९ डिसेंबर हा दिवस तर ‘पीक पॉवर ‘ ठरला.यादिवशी २१३.६२ गिगावॉट इतकी मागणी होती.तर याच महिन्यात सर्वात कमी म्हणजे १७४.१६ गिगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top