हातकणंगले – तालुक्यातील ग्रामीण भागात यंदा अत्यल्प पावसामुळे मोठी चारा टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. त्यातच शेतकर्यांनी जपून ठेवलेल्या जनावरांच्या चाऱ्यावरही भुरटे चोर डल्ला मारू लागले आहेत. चारा टंचाई आणि चार्याची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी आता परिसरातील गोकुळसह अन्य साखर कारखान्यांनी चारा छावण्या सुरू करून बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.कमी पावसामुळे चारा टंचाई असल्याने दुधाचे उत्पादनही घटले आहे. तालुक्यातील अर्थकारण शेती आणि दूध धंद्यावर अवलंबुन आहे.काही दूध संघांनी गेल्या महिन्यांपासून लिटरमागे चार रूपयांची कपात केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.