हैदराबाद
हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना खुले आव्हान दिले. “१५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर मोठ्याला (एमआयएमचे अध्यक्ष स्थानिक खासदार असदुद्दीन ओवेसी) आणि धाकट्याला (एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी ) कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असे आक्षेपार्ह वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. राणांच्या या विधानामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी त्यांच्या या विधानावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा काल हैदराबादमध्ये गेल्या होत्या. या सभेचा व्हिडीओ भाजपा खासदाराने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात त्यांनी असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान २०१२ मध्ये अकबरुद्दीन ओवेसीने यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. ते तेलंगणातील करीमनगरमध्ये म्हणाले होते की, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवले तर आम्ही २५ कोटी (मुस्लिम) आणि १०० कोटी हिंदूंना संपवू.