मुंबई
संयुक्त अरब अमिरातीला कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले आहेत. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी १२ ते १५ रुपये किलोने कांदा विकल्याचा आरोप त्यांनी केला असून हाच कांदा संयुक्त अरब अमिरातीच्या दुकानात निर्यात केल्यानंतर १२० रुपये किलोने विकला जात आहे.
कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना, संयुक्त अरब अमिराती सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेली. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्याने निवडक आयातदार प्रचंड नफा कमावत आहेत. निवडणुकीच्या काळात कांद्याचे वाढलेले भाव पाहता सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकारने काही अटींच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर सूट दिली. या आधारे संयुक्त अरब अमिरातीला कांदा निर्यात करण्यात आला.