१७ रुपयांच्या साडीने लोकांचे मतपरिवर्तन करू शकत नाही

बच्चू कडूंचा नवणीत राणांना टोला

अमरावती

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभू्मीवर सध्या अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली. १७ रुपयांच्या साडीने लोकांचे मतपरिवर्तन करू शकत नाही, असा टोला कडू यांनी लगावला. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असेही ते म्हणाले.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडे अमरावती लोकसभा मतदारसंघामधील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रहारने शिवसैनिक दिनेश बूब यांना उमेदवारी देत या ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप अंतर्गत नवनीत राणा यांच्या उमेदवारीबद्दल तीव्र नापसंती आहे. आता नवनीत राणा यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोन लाखांच्या मतांनी पराभूत करु, वेळप्रसंगी नवनीत राणांचे डिपॉझिट जप्त करु असा इशारादेखील कडूंनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top