बंगळुरू- विप्रो पाठोपाठ आता भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने घरून काम करणाऱ्या कर्मचार्यांना आठवड्यातून किमान ३ दिवस कार्यालयात येण्याची सूचना केली आहे.
गेल्या ३ वर्षांपासून कोविड महामारीमुळे बहुतेक कर्मचारी घरून काम करत होते,परंतु आता कंपनीचा असे वाटत आहे की, आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे आवश्यक आहे.याला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी उत्पादकता आणि आर्थिक वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.बंगळुरूमध्ये असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनाने घरातून काम करणाऱ्या कर्मचार्यांना सांगितले आहे की, ”आता कृपया आठवड्यातून किमान ३ दिवस तरी कार्यालयात येणे सुरू करा . हे लवकरच अनिवार्य होईल.”