ठाणे – अयोध्येत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आता भक्तगण आतुर झाले आहेत.त्यामुळे भाजपने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ‘चलो अयोध्या ‘ मोहीम आखली आहे. त्यामध्ये ठाण्यातून भाजपच्यावतीने ७ फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे.७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता ही विशेष ठाण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. ही गाडी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.५० वाजता अयोध्येत पोहचणार आहे.त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी १० फेब्रुवारीला अयोध्येतून निघेल.ही गाडी १२ फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहेचेल.या ट्रेनमधून जाऊ इच्छिणार्यांनी आपली नावे,आधार कार्ड झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयात जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.