निवडणुकीत मते कशी वाढली? याचिकेवर उद्या निकाल

How did votes increase? Petition verdict tomorrow

How did votes increase? Petition verdict tomorrow

मुंबई- राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीत(Vidhansabha Eleaction) मतदानाची वेळ संपल्यानंतर ७६ लाख मते वाढल्याचा दावा विरोधी पक्षासह सामान्य जनतेतही चर्चिला गेला होता. याच निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा मुद्दा उपस्थित करणारी याचिका विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी उच्च न्यायालयात(HC) दाखल केली आहे.या याचिकेवरील सुनावणी काल सोमवारी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम निकाल उद्या बुधवार २५ जून रोजी घोषित केला जाणार आहे.

याचिकाकर्ते चेतन अहिरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली.न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादासह प्रतिवादी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारचे म्हणणेही ऐकून घेत निकाल राखून ठेवला यासंदर्भात आता उद्या २५ जून रोजी न्यायालय आपला अंतिम निकाल जाहीर करणार आहे.

सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयातील युक्तिवादावर प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. त्यांनी याआधी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख या नात्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)आणि विरोधी पक्षांना १६ जानेवारीला पत्र लिहून ईव्हीएम (EVM) वापर व १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या बदलांच्या विरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते. त्यांनी म्हटले आहे की,ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त ‘चूक’ नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसह लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची नोंद झाली.जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही.२८८ मतदारसंघांपैकी १९ जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर ७६ जागांवर कमी मतदान नोंद झाले आहे.