Minister Bharat Gogawale on MP Narayan Rane
सिंधुदुर्ग – भाजपा खासदार नारायण राणे(MP Narayan Rane) यांनीही भानगडी केल्या. ते सहज एवढ्या उंचीवर पोहचले नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले(Minister Bharat Gogavale) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पावशी येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. त्यांनी राणेंबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (UBT)यांनी गोगावले यांचे वक्तव्य योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खासदार नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी पोहचले नाही. त्यांनी अंगावर पोलीस केस घेतल्या, मर्डर, (murder)भानगडी झाल्या प्रसंगी तुरुंग(jail) भोगले. भानगडी करा असे सांगत नाही पण आपल्याला आता जुळवून चालायचे आहे. शिवसेनेत भानगडी केल्याशिवाय नेता घडत नाही. केसरकर भानगडी करत नाहीत म्हणून त्यांना अडचणी येतात. नीलेश राणे यांची पद्धत वेगळी आहे. आता मात्र भानगडी करण्याचे दिवस संपले. सर्वांनी एकत्र काम करायचे आहे. काही वेळा मागेपुढे वाईटपणा येईल, तो वाईटपणा घ्यायला लागला तरी चालेल. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही ज्याला तिकीट देऊ त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा. जर कोणी कोणाला पाडण्याचा प्रयत्न केला तर तुमचा जय महाराष्ट्र झालाच असे समजा. महायुतीत कोणीही असा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही.
रायगड (Raigad)पालकमंत्री(palakmantri) पदाबाबत ते म्हणाले की, पालकमंत्रीही आम्ही होऊ. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही काम करतो, त्याचा मोबदला मागतो. काम न करणाऱ्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही. एखादी चूक झाली तर चार वेळा माफी मागितली तर तो पुढे जाईल पण चुकले तर माफी मागू पण आम्ही जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत पण नाही हा आमचा बाणा आहे. असेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे.
यावर उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, मंत्री भरत गोगावले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या मनात जे असते तेच ओठात असते. खासदार राणे यांच्याबद्दल ते जे बोलले ते योग्य आणि खरे बोलले.खरे तर यांनी त्यांची संघटना अशा गोष्टीनीच वाढवली आहे. फक्त गोगावले यांना प्रश्न आहे की, तुम्ही काल(shinde group) शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आला होतात. ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर, मारामारी करून पक्ष वाढवला, त्याप्रमाणे तुम्ही येथील कार्यकर्त्यांना मारामारी, खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होतात का ?