मिठी नदी प्रकरणी जय जोशींना पुरावा नसताना अटक आणि जामीन

Mithi river desilting scam- Jay Joshi

मुंबई –  Mithi river desilting scam उद्योजक Jay Joshiयांची विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. कथित भ्रष्टाचारप्रकरणाशी जोशी यांचा संबंध असल्याचे किंवा पालिकेची फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू दिसून येत नाही,असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. Mumbai पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला ही चपराक मानली जाते.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटात ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवून आर्थिक गुन्हे शाखेने व्हिर्गो स्पेशालिटीजचे (Virgo Specialties Pvt Ltd)मालक जय जोशी यांना ६ मे रोजी अटक केली होती. जोशी यांनी व्हिर्गोचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन कदम आणि मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून गाळ काढणाऱ्या कंत्राटदाराला व्हिर्गो कंपनीकडून जास्त दराने यंत्रे भाडयाने घेण्यास भाग पाडले. त्यामुळे महानगरपालिकेचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले,असा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने ठेवला होता.
जोशी यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढला. जोशी हे व्हिर्गो कंपनीचे केवळ एक संचालक आहेत. त्यांनी केतन कदम यांची ५ मे २०२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली.तेव्हापासून कंपनीचे सर्व व्यवहार कदम यांच्या हाती होते. त्यामुळे मिठी नदीप्रकरणी जोशी यांच्याविरूद्ध भादंवि कलम 420 अन्वये फसवणुकीचा खटला चालविला जाऊ शकत नाही,असा युक्तिवाद जोशी यांच्या वकिलांनी केला.तो ग्राह्य धरून न्यायालयाने जोशी यांची जामिनावर मुक्तता केली.