मुंबई
राज्यात ११ ते १५ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबरच्या सुमारास अरबी समुद्रात एक चक्रीवादळ निर्माण होईल. हे चक्रीवादळ पुढे ओमानच्या दिशेने सरकेल, मात्र ते जाताना राज्यातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोकणातील सर्व जिल्हे, अहमदनगर, सोलापूर या भागांचा समावेश आहे. याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी माहिती दिली. ११ डिसेंबरनंतर सुरू होणारा पाऊस जवळपास १६ डिसेंबरपर्यंत राहील. या काळात उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.