Home / महाराष्ट्र / Maharashtra Bandh : 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; ‘या’ पक्षाने केली घोषणा

Maharashtra Bandh : 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; ‘या’ पक्षाने केली घोषणा

Maharashtra Bandh : राजधानी दिल्लीत ‘चलो संसद’ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस कारवाई आणि लाठीमाराची धग आता संपूर्ण देशभरात पसरू...

By: Team Navakal
Maharashtra Bandh : 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; 'या' पक्षाने केली घोषणा
Social + WhatsApp CTA

Maharashtra Bandh : राजधानी दिल्लीत ‘चलो संसद’ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस कारवाई आणि लाठीमाराची धग आता संपूर्ण देशभरात पसरू लागली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ‘वंचित बहुजन आघाडी’चे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे.

या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना एकत्र येण्याचे विनंती केली आहे. सरकारच्या दडपशाहीविरुद्ध महाराष्ट्रातून कडक संदेश देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; शरद पवार थेट जंतरमंतरवर दाखल

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता देशातील बड्या राजकीय नेत्यांचे थेट बळ मिळताना दिसत आहे:

  • शरद पवारांची जंतरमंतरला भेट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
  • उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत दाखल होत आहेत. ते आंदोलक विद्यार्थी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
  • पंतप्रधान निवासावर मोर्चा: एकीकडे राहुल गांधी यांनी खासदारांसह पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलन केले, तर दुसरीकडे शरद पवार यांनी जंतरमंतरवर धाव घेतल्याने केंद्र सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र झाला आहे.

अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

दिल्लीतील पोलीस कारवाईचे पडसाद महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उमटू लागले आहेत:

  1. पावसातही जोरदार घोषणाबाजी: अहिल्यानगरमध्ये रिमझिम पावसात विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.
  2. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: “मोदी हटाव देश बचाव” आणि “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला.
  3. कडक कारवाईची मागणी: दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने पद सोडण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Vijeta Dahiya

Vijeta Dahiya : विद्यार्थी रस्त्यावर लाठ्या खात असताना मुख्य प्रवक्त्यांचा अहंकार उफाळला? बर्गर विधानाचा फटका, मुख्य प्रवक्तेपदावरून थेट हकालपट्टी;’सीजेपी’ पक्षाची विजेता दहिया यांच्या बेजबाबदार विधानानंतर कडक कारवाई..