नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४३ नवे रुग्ण आढळले. परिणामी देशात सक्रीय रुग्णांची संख्या ३९९७ वर पोहोचली, तर कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेले रुग्ण हे केरळ(३), कर्नाटक (२), तामिळनाडू (१) आणि छत्तीसगडमधील (१) आहेत. सर्व राज्यांत सतर्कता बाळवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. आतापर्यंत गेल्या चार वर्षांत देशभरातील चार कोटी लोकांना कोरोनाचे लागण झाली आहे. त्यात ५.३ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान आज मुंबईत कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळले असून त्यातील तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले,तर २२ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरात एका दिवसांत १५ कोरोना रुग्ण आढळले आहेत.