टाटा समूहाच्या संचालकांची माफी १८७ मृतदेह कुटुंबियांना दिले

Tata Group Director N. Chandrasekaran apologizes, 187 victims' families compensated

Tata Group Director N. Chandrasekaran apologizes, 187 victims’ families compensated

मुंबई – टाटा सन्स Tata Group आणि एअर इंडियाचे AIR INDIA अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी २ जून रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेबद्दल माफी मागितली.अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही क्षणात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांसह एकूण २७५ जणांचा मृत्यू झाला. त्यात २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातनंतर एअर इंडियावर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना चंद्रशेखरन यांनी माफी मागून दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. 275 victims

गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी अशी माहिती दिली की, या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २१० जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे. त्यापैकी १८७ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, जे मृतदेह कुटुंबियांना दिले आहेत त्यामध्ये १३१ भारतीय नागरिक, ४ पोर्तुगीज, ३० ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन आणि ६ प्रवासी नसलेले मृतदेहांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर ७१ जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यापैकी फक्त ७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.