२९ जूनला अंतरवाली सराटीत मराठ्यांची राज्यव्यापी बैठक

manoj jarange patil

जालना – मराठा आंदोलक (Maratha activist) मनोज जरांगे-पाटील यांनी २९ जूनला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) राज्यव्यापी मराठा बैठक बोलावली आहे. ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा (Maratha community)निर्णय व्हावा, अशी मागणी याआधीच जरांगे- पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी सरकारला २९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली असून, त्यानंतर मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आणि मुंबई आंदोलनाची तयारी करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) म्हणाले की,मराठ्यांची लाट काय असते हे दाखवून द्या. एक दिवसासाठी काम बाजूला ठेवा. गाव, तालुका, जिल्हा, शहर सगळीकडून मराठा समाज एकत्र यावा. २९ जूनला कोणीही घरी राहू नये. मराठ्यांच्या अस्मितेचा आणि भविष्याचा हा प्रश्न आहे . मनभेद, मतभेद बाजूला ठेवा. आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. सरकार काय करते, याचा आम्हाला अंदाज नाही. पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणारच. २९ ऑगस्टला मराठ्यांची (Maratha community)लाट काय असते ते सगळ्यांना पाहायला मिळेल. हे मराठी राज्य आहे. इथे मराठीचीच सक्ती पाहिजे आणि ती भाषा सर्वांना आली पाहिजे. या सरकारने हिंदी सक्ती केली तर भारतात त्यांनी मराठीची सक्ती केली पाहिजे. हे सरकार देशभरात मराठीची सक्ती करणार आहे का?