CJI Gavai on Judicial Reform | भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI Gavai) यांनी तेलंगाणातील मेडचल येथील नॅलसार युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात कायदेशीर व्यवस्थेवर महत्त्वाचे मत मांडले. न्यायवस्थेत (Judicial Reform) मोठी सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बी आर गवई म्हणाले की, न्यायव्यवस्था अद्वितीय आव्हानांना तोंड देत असून, प्रदीर्घ खटले आणि अंडरट्रायल कैद्यांचे दुःख हे गंभीर प्रश्न बनले आहेत. गवई यांनी व्यवस्थेला दुरुस्त करण्याची गरज अधोरेखित केली, पण भविष्याबाबत सावध आशावाद व्यक्त केला.
गवई यांनी नमूद केले की, खटले दशकांपर्यंत चालतात, ज्यामुळे अनेक अंडरट्रायल कैदी अनेक वर्ष तुरुंगात राहतात व त्यानंतर निर्दोष आढळून येतात. “ही मानवी हानी थांबवायला हवी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कायदा पदवीधरांना संबोधित करताना गवई यांनी सचोटी आणि वचनबद्धतेने सुधारणा करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रभावापेक्षा मार्गदर्शक निवडण्याचा सल्ला दिला आणि शिष्यवृत्तीद्वारे परदेशात शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन दिले.
दरम्यान, नॅलसार युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाला तेलंगणा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश सुजय पॉल, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा उपस्थित होते.
हे देखील वाचा –