Mithun Manhas BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मधील सर्वोच्च प्रशासकीय पद आता क्रिकेटपटूंच्या हातात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. BCCI च्या अध्यक्षपदी आता मिथुन मन्हास यांची निवड करण्यात आली आहे.
सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांसारख्या मोठ्या नावांना मागे टाकून मन्हास यांची निवड होणे हा थोडा आश्चर्याचा धक्का असला तरी, ते एक हुशार प्रशासक म्हणून ओळखले जातात.
45 वर्षीय मन्हास यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) चे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक म्हणून केलेले काम त्यांची प्रशासकीय क्षमता सिद्ध करते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जम्मू आणि श्रीनगर येथील क्रिकेट सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या. विशेषतः, त्यांनी पीच बदलण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे येथील क्रिकेटपटूंच्या खेळण्याच्या स्तरावर मोठा परिणाम झाला आहे.
मन्हास यांच्यासमोरची आव्हाने
BCCI अध्यक्षपद हे प्रचंड जबाबदारी, दृश्यमानता आणि तपासणी घेऊन येते. या पदासाठी मानसिक कणखरताe) आवश्यक आहे.
यापूर्वीचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांची खेळाडू म्हणून मोठी प्रतिष्ठा होती, ज्यामुळे त्यांना तत्काळ आदर मिळाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागले नाही.
मन्हास यांच्यासमोर मात्र, हे ‘लक्झरी’ उपलब्ध नाही. राज्यस्तरीय प्रशासनात निपुण असले तरी BCCI मधील अधिकारी वर्ग आव्हानात्मक आहे आणि त्यांना अनुभवी प्रशासकांमध्ये स्वतःची जागा तयार करावी लागेल. लवकरच भारतात टी20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार असल्याने त्याेळी त्यांची प्रशासकीय कौशल्ये खरी पणाला लागतील.”
कोण आहेत मिथुन मन्हास?
मिथुन मन्हास यांनी 157 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 9,714 धावा करत 18 वर्षांची प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्द अनुभवली आहे. रणजी ट्रॉफी जिंकलेल्या दिल्ली संघाचे ते भाग होते.त्यांनी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंसह दिल्लीचे ड्रेसिंग रूम शेअर केले आणि अनेक सीझनमध्ये त्यांचे यशस्वी कर्णधारपद भूषवले आहे. स्टार खेळाडूंमध्येही त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये सलोखा कायम ठेवला.
जुने सहकारी सेहवाग आणि आशिष नेहरा कोचिंगच्या भूमिकेत आल्यावर त्यांनी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्ससाठी काम केले आहे.
हे देखील वाचा – Asia Cup 2025 Final: पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाने ट्रॉफी का नाकारली? जाणून घ्या नेमकं कारण