Bacchu Kadu : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याऐवजी, एखाद्या आमदाराला कापून टाका असे खळबळजनक विधान त्यांनी या वेळी केले आहे
शेतकऱ्यांना उद्देशून कडू यांनी प्रश्न केला, “जर कापसाला ३,००० रुपये भाव मिळाला तर तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल की मी आत्महत्या करेन. अरे, आत्महत्या करण्याऐवजी एखाद्याला मारून टाका, एखाद्या आमदाराला मारून टाका, मग आत्महत्येचा विचार करण्याची गरजच राहणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “आत्महत्या करण्यापेक्षा, आमदारांच्या घरी जाणे, तुमचे सर्व कपडे काढून तिथे बसणे आणि घरासमोर लघवी करणे चांगले; ते मरण्यापेक्षा चांगले आहे.” पुढे बोलताना बच्चू कडू म्हणले तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे आमचा शेतकरी मागे राहिला. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं अशी खळबळजनक विधाने त्यांनी या वेळी केली. बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल केलेल्या विधानानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
हे देखील वाचा –