Home / महाराष्ट्र / El Nino Effect : बळीराजावर अस्मानी संकट! एल निनोच्या सावटात अवकाळीचा तडाखा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’चे आदेश.

El Nino Effect : बळीराजावर अस्मानी संकट! एल निनोच्या सावटात अवकाळीचा तडाखा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’चे आदेश.

El Nino Effect : महाराष्ट्र राज्य सध्या हवामान बदलाच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. आगामी पावसाळ्यात ‘एल निनो’ या हवामान...

By: Team Navakal
El Nino Effect
Social + WhatsApp CTA

El Nino Effect : महाराष्ट्र राज्य सध्या हवामान बदलाच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. आगामी पावसाळ्यात ‘एल निनो’ या हवामान विषयक स्थितीमुळे पावसाचे प्रमाण घटण्याची आणि त्यात मोठा खंड पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने तातडीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जपून वापरण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच नाही, तर शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रालाही फटका बसण्याची शक्यता असल्याने भविष्यात पाणी कपातीचे कठोर पाऊल उचलले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

रत्नागिरीत पावसाचा इशारा आणि वादळी वारे-
कोकण किनारपट्टीवरही हवामानाने कूस बदलली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून २१ एप्रिलच्या रात्रीपासून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. अद्याप मुसळधार वृष्टी झाली नसली तरी, निसर्गाचा हा लहरीपणा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार-
राज्याच्या इतर भागांत मात्र अवकाळी पावसाने आधीच थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस आणि भिलवडी परिसरामध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे उसाच्या शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या आंब्याच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातही उन्हाच्या तीव्र झळांनंतर (४१-४२ अंश सेल्सिअस) पावसाने हजेरी लावली. औसा परिसरात गारपीट झाल्याने आंबा पिकाला मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे.

धाराशिवमध्ये निसर्गाचा भीषण प्रकोप: शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत-
सर्वात हृदयद्रावक घटना धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे घडली आहे. शेतात कडब्याची गंज रचण्याचे काम करत असताना ५५ वर्षीय शेतकरी बबन लांडगे यांचा अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसांनंतर त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह संपन्न होणार होता.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या